काल (शुक्रवार) भाजपाच्या उमेदवारांची अखेरची यादी जाहीर झाली. तसंच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचाही दिवस होता. भाजपाच्या उमेदवारांच्या यादीतून विद्यमान मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित, प्रकाश महेता यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यावर शिवसेनेने आपल्याच मित्रपक्ष भाजपावर जोरदार टीका केली आहे. राजकारणाच्या या बाजाराला शिवसेनेने ‘बिग बाझार’ची उपमा दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्क्याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार? अशा शब्दात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झाला आहे. कुणी त्यास रणधुमाळीदेखील म्हणत असतात, पण जे सध्या चालले आहे तो संग्राम वगैरे नसून त्यास ‘बिग बझार’च म्हणावे लागेल. आमदारकीच्या खुर्च्यांसाठी अनेकांचे गाजेवाजे बंद झाले व चुपचाप ‘सेल’साठी ते लोकशाहीच्या बिग बाजारमध्ये सध्या उभे राहिले आहेत. बिग बाजारात ज्याप्रमाणे विविध दुकाने व स्टॉल्स असतात तसे निवडणुकीत आता दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्क्याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार? असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. अग्रलेखातून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांचा स्टॉल या बिग बाजारमध्ये किमान पस्तीस वर्षे होता. यावेळी ते नाहीत. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक पक्षांतर्गत विरोधक खडय़ासारखा बाजूला काढण्यात यश आले आहे. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. २०१४ साली महाराष्ट्रात ‘युती’ तुटल्याची घोषणा करून शौर्यपदक छातीवर लटकवणारे हेच खडसे होते. २०१९ मध्ये खडसे कोठेच नाहीत व त्यांना पूर्णपणे दूर केले गेले आहे. तर चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर- सांगलीच्या महापुरातून वाहत आले व त्यांचे गलबत पुण्यातील कोथरूड मतदारसंघाला लागले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

आमदारकीच्या खुर्च्यांसाठी अनेकांचे गाजेवाजे बंद झाले व चुपचाप ‘सेल’साठी ते लोकशाहीच्या बिग बाजारमध्ये सध्या उभे राहिले आहेत. बिग बाजारात ज्याप्रमाणे विविध दुकाने व स्टॉल्स असतात तसे निवडणुकीत आता दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्क्याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार? विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झाला आहे. कुणी त्यास रणधुमाळीदेखील म्हणत असतात, पण जे सध्या चालले आहे तो संग्राम वगैरे नसून त्यास ‘बिग बझार’च म्हणावे लागेल. निवडणुकांचा मोठा होलसेल बाजार भरला आहे. इतका मोठा सेल महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच लागला नव्हता. आता तो लागला याचे श्रेय कोणाला द्यावे? मात्र सब घोडे बारा टके आणि हमाम में सब नंगे असेच असल्याने तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असेच सगळे सुरू आहे. काल ज्यांच्यावर टीकेचा भडिमार केला त्यांच्याच पालख्या उचलणारे भोई या बिग बाजारात आज दिसत आहेत.

चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर- सांगलीच्या महापुरातून वाहत आले व त्यांचे गलबत पुण्यातील कोथरूड मतदारसंघाला लागले. त्यावरून भाजपच्या विद्यमान आमदारांच्या अश्रूंना महापूर आला. आमदारकीच्या खुर्च्यांसाठी अनेकांचे गाजेवाजे बंद झाले व चुपचाप ‘सेल’साठी ते लोकशाहीच्या बिग बाजारमध्ये सध्या उभे राहिले आहेत. हे चित्र केविलवाणे आहे. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक पक्षांतर्गत विरोधक खडय़ासारखा बाजूला काढण्यात यश आले आहे. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. 2014 साली महाराष्ट्रात ‘युती’ तुटल्याची घोषणा करून शौर्यपदक छातीवर लटकवणारे हेच खडसे होते. 2019 मध्ये खडसे कोठेच नाहीत व त्यांना पूर्णपणे दूर केले गेले आहे. ‘‘मी का नको ते अगोदर सांगा,’’ असा व्याकुळ करणारा सवाल श्री. खडसे यांनी विचारला आहे. राजकारण हे किती बेभरवशाचे आहे याचा अनुभव खडसे घेत आहेत. 2014 मध्ये खडसे यांच्या हातात बरेच काही होते. आज वेदना, संताप, हतबलता व जळफळाटाशिवाय त्यांच्याजवळ काहीच नाही. ‘युती’ तोडण्याची घोषणा करणारे खडसे यांच्यावर आज संन्यास घेण्याची वेळ आली, पण 2019 ला ‘युती’ झाली आहे. या युतीत खडसे नाहीत.