चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी करायला सांगितली, शिवसेनेला कमी जागा याव्यात हा त्यांचा यामागचा उद्देश होता असा आरोप शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात युतीची जी पिछेहाट झाली त्याला खासदार संजय मंडलिक जबाबदार आहेत असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपाला आता संजय मंडलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली. अशात त्यांना इथल्या पराभवाचं खापर जर चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या माझ्यावर फोडायचं असेल तर काय बोलायचं असंही मंडलिक यांनी विचारलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपाची जी पिछेहाट झाली, पराभव झाला त्याला चंद्रकांत पाटील कारणीभूत आहेत कारण बंडखोरी करायला त्यांनीच सांगितलं होतं असा आरोप आता संजय मंडलिक यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेनेला कोल्हापुरात भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या म्हणून चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी यांनी सांगितली असा आरोपही संजय मंडलिक यांनी केला. एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील जर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर पक्षातली बंडखोरी त्यांनी का थांबवली नाही? ती होऊ का दिली? याचा विचार केला तर संशय घ्यायला जागा नक्कीच आहे असंही मंडलिक यांनी म्हटलं आहे.

Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

निवडणूक निकालाबाबतही संजय मंडलिक यांनी भाष्य केलं. या निवडणूक निकालाबाबत सगळ्याच पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मंडलिक म्हणाले. प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ लक्षात घेऊन मतदारराजा त्याप्रमाणे विचार करतो आहे ही बाब लक्षात घ्यायला हवी. लोकसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते. आता विधानसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते असंही मंडलिक यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असंही मंडलिक यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर जिल्ह्यात संजय मंडलिक यांनी सोयीचं राजकारण केलं त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेचा पराभव झाला असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपाला संजय मंडलिक यांनी केला आहे.