काही पक्षांनी पाठिंबा मिळाल्याचा आव आणला तरीही असमर्थ ठरले असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज्यावर अस्मानी संकट असताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या गोष्टीला काही लोकांचा हट्ट कारणीभूत ठरला आहे असाही टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. योग्य क्षणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु असंही ते म्हणाले. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर झाला असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. भाजपा अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.