scorecardresearch

Premium

उजनी धरणातून ६० हजार क्युसेकचा विसर्ग

यंदाच्या हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि उजनी धरण १०० टक्के भरली आहेत.

ujani dam
(संग्रहित छायाचित्र)

पंढरपूर : उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्यचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून ६० हजार क्युसेकचा तर वीर धरणातून १७ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर नाझरे धरणातून कऱ्हा नदीत १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कऱ्हा नदीचे पाणी निरा नदीत मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत  वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केली आहे.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
devendra fadnavis (1)
“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

यंदाच्या हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि उजनी धरण १०० टक्के भरली आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरण लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भीमा नदी पात्रात सध्या ३० हजार ७५९ क्युसेक पाणी वाहत आहे.  त्यामुळे दगडी पूल  तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पूळूज हे  ६ बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

भीमा  नदीपात्रात १ लाख १५ हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. नदीपात्रात जर १ लाख ३८  हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. सध्या वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी. असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केली आहे. भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे. नदीकाठच्या  गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरू नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 60 thousand cusecs of water released from ujani dam zws

First published on: 19-10-2022 at 03:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×