मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी ७ ते ८ वाहनांनी धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवा कडून शिरपूरकडे येत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडला असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या विचित्र अश्या भीषण अपघातात एकामागून एक असे ७ ते ८ वाहनांनी मागच्या बाजूने धडक दिली. यात तिन ते चार चारचाकी वाहनांचा तर काही ट्रकांचा समावेश आहे. या घटनेत चारचाकी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील घटनास्थळी हजर आहे.