मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी ७ ते ८ वाहनांनी धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवा कडून शिरपूरकडे येत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडला असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on mumbai agra national highway four people are likely to have died srk
First published on: 27-10-2021 at 22:21 IST