शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे सध्या औरंगाबादमध्ये आहेत. आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महालगावमधील प्रकारावर भाष्य केलं. 'आमची सभा नीट झाली. काही लोकांना वातावरण बिघडवायचं असेलही. पण या शिवसंवाद यात्रेदरम्यान शेतकरी बांधवांसोबत संवाद होत आहे', असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.