बेभरवशाच्या शेतीमध्ये सध्या ऊस हे असं पीक आहे की ज्यातून शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात. मात्र, अशातही उसाचा कोणता वाण लावला जातो त्यावर त्या उसाला किती दर मिळणार हे ठरतं. उसाच्या प्रत्येक वाणानुसार टनामागे मिळणारं साखरेचं प्रमाण म्हणजेच साखरेचा उतारा बदलतो. त्यावरूनच उसाचे दर ठरतात. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगात अनुभवी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका,” असं मत पवारांनी व्यक्त केलं. तसेच कोणता ऊस लावावा यादीच सांगितली आहे. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “सध्या रानं ओली आहेत, वापसा नाही. त्यामुळे आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली होणार नाही. रिकव्हरी चांगली आली तरच उतारा चांगला पडतो, साखर जास्त निघते. साखर जास्त निघाली, तर भाव चांगला मिळतो. एका टन ऊसातून किती साखर निघते यावर ते अवलंबून असतं. काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो साखर निघते. म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे.”

dr amol kolhe, central government, BJP, mahatma phule , farmer issues
चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात आसूड उगारण्याची वेळ आली – खासदार डॉ. अमोल कोल्हे
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

“इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका”

“एका टनातून किती साखर निघणार हे जमिनीच्या पोतावर, उसाचं बेणं कोणतं आहे यावर अवलंबून असतं. माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका. तुमचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६-०-३२ , ८०-०५, १०-००१, १२-१२-१ ही उसाची बेणी वापरा,” असा सल्ला अजित पवारांनी दिली.

“कमी पाण्यात उसाचं जास्त उत्पादन होईल यावर संशोधन”

अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्ट्युट ही संस्था चालवतो. तिथं नवीन उसाचं बेणं तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कमी पाण्यात त्या उसाला दशी न पडता उसाचं टनेज जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. त्यातून काही वाणांचा शोध लगाला.”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”

“पाडेगावमध्ये काही प्रसिद्धीला आणल्या. कोल्हापूरमध्ये आजरा म्हणून तालुका आहे. त्याही भागात नवीन बेणं शोधलं,” असंही त्यांनी नमूद केलं.