महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “ तारीख पे तारीख तो होनेवाली है. तो त्यांचा अधिकार आहे. न्यायव्यवस्थेला कोणी, तुम्ही-आम्ही विचारू शकतो का? आपल्याकडे त्यांना(शिवसेनेला) जो अधिकार आहे तो अधिकार ते वापरणार. आम्हीपण बघतोय सारख्या तारखा सुरू आहेत. जवळपास सहा महिने झाले तारखा सुरू आहेत. आता पुन्हा फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे.”

shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर! आता १४ फेब्रुवारीपासून होणार सलग सुनावणी

“ शेवटी वकीलाच्या मार्फत ती केस मांडणं, हे काम शिवसेना करते आहे आणि आपण हे सगळं पाहतोय. तिथे आपण काय करणार? तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांना दिला गेलेला आहे. कायदा, घटनेना अशा सगळ्यांनी मिळून त्यांना दिलेला आहे.”

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एक महिन्याने सुनावणी का? प्रत्यक्ष हजर असणारे वकील म्हणाले, “कारण…”

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरूद्ध शिंदे हा संघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. याआधीही अनेकदा तारीख पे तारीखचा अनुभव आला होता. त्यानंतर आज काहीतरी ठोस निर्णय दिला जाईल असं वाटलं होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सलग घेतली जाईल.