Ambadas Danave on Vidhansabha Election Result 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेतही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील काही नेत्यांनी दिले. त्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट काँग्रेसवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा अतिआत्मविश्वास नडला असं अंबादास दानवे म्हणाले.

अंबादास दानवे म्हणाले, “लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनात जास्त आत्मविश्वास आला असावा. जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस जिंकू शकत होती, अशी स्थिती होती.”

Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Uddhav Thackeray Shiv Sena Will Contest Local Body Polls Alone Sanjay Raut
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, विरोधकांची टीका
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”

दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेसमोर आणावा अशी भूमिका शिवसेनेने (उद्धव ठाकरे) यांनी आधापासूनच घेतली होती. संजय राऊतांनी ही भूमिका वेळोवेळी बोलूनही दाखवली. परंतु, या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने विरोध केला. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवता विधानसभा निवडणूक लढवली. मुख्यमंत्री पदाबाबत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवलं जाईल, असं महाविकास आघाडीचं ठरलं. मात्र, याच सुत्रामुळे महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्क्याने पराभव स्वीकारावा लागला असं मत अंबादास दानवेंनी व्यक्त केलंय.

ते म्हणाले, “कोणतं खातं मिळावं याकरता काँग्रेस चर्चा करत होते. मुख्यमंत्री पदासाठी १० जण इच्छुक होते हे सत्य आहे. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आलं असतं तर २-५ टक्के जास्त मते मिळाली असती.”

हेही वाचा >> Sharad Pawar : “शरद पवारांनी कायमचं घरी बसावं, त्यांनी अनेकांचं वाटोळं केलंय”, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची बोचरी टीका

u

महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार?

विधानसभा निवडणुकीत ९५ जागा लढवून केवळ २० ठिकाणी विजय झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा त्यांचा आग्रह आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचे सांगितले. यावर आता संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे. पराभव होताच मविआमधून बाहेर पडण्याचा काही जणांनी सूर आळवला असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Story img Loader