बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका करू ठेवलाय, असं ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी शिवराज्यभिषेक दिनाला म्हणजेच ६ जून रोजी रायगडावर जाणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे.

हेही वाचा – Video: पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा सरकारला इशारा; माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून म्हणाले, “…नाहीतर तिथे गणपती मंदिर बांधू!”

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले

काय म्हणाले अमोल मिटकरी?

मनसेच्या मेळाव्यावर ट्वीट करताना मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख हास्यसम्राट असा केला. “धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा..महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जूनला रायगडावर जाणार असं समजलं, पण हे महाशय गड चढून जाण्याची हिंमत करतील का?” अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं, कावळ्याची टीवटीव नव्हे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं.

हेही वाचा – “माझ्या भाषणानंतर उद्या तोंड उचकटू नका, नाहीतर…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा!

दरम्यान, बुधवारी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरदेखील तोफ डागली. शिवसेनेतील संघर्षावर बोलताना ते म्हणाले, “शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, हा विषय जेव्हा सुरू होता, त्यावेळी मला वेदना होत होत्या. कारण तो पक्ष मी जगलो आहे”. तसेच पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गटाला इशाराही दिली. “काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्या वाटल्या म्हणून मी बोलतोय. मला पुन्हा या गोष्टींचा चिखल करायचा नाही. घरातल्या गोष्टी बाहेरही काढायच्या नाहीत. मी आताच त्यांच्या बाजुच्या लोकांना (ठाकरे गट) सांगतो, माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. त्यानंतर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही”, असे ते म्हणाले.