“धन्य ते हास्यसम्राट अन् धन्य त्यांची…”; राज ठाकरेंच्या भाषणावर आमदार अमोल मिटकरींची खोचक टीका!

बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली.

amol mitkari on raj thackeray speech
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका करू ठेवलाय, असं ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी शिवराज्यभिषेक दिनाला म्हणजेच ६ जून रोजी रायगडावर जाणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – Video: पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा सरकारला इशारा; माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून म्हणाले, “…नाहीतर तिथे गणपती मंदिर बांधू!”

काय म्हणाले अमोल मिटकरी?

मनसेच्या मेळाव्यावर ट्वीट करताना मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख हास्यसम्राट असा केला. “धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा..महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जूनला रायगडावर जाणार असं समजलं, पण हे महाशय गड चढून जाण्याची हिंमत करतील का?” अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं, कावळ्याची टीवटीव नव्हे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं.

हेही वाचा – “माझ्या भाषणानंतर उद्या तोंड उचकटू नका, नाहीतर…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा!

दरम्यान, बुधवारी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरदेखील तोफ डागली. शिवसेनेतील संघर्षावर बोलताना ते म्हणाले, “शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, हा विषय जेव्हा सुरू होता, त्यावेळी मला वेदना होत होत्या. कारण तो पक्ष मी जगलो आहे”. तसेच पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गटाला इशाराही दिली. “काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्या वाटल्या म्हणून मी बोलतोय. मला पुन्हा या गोष्टींचा चिखल करायचा नाही. घरातल्या गोष्टी बाहेरही काढायच्या नाहीत. मी आताच त्यांच्या बाजुच्या लोकांना (ठाकरे गट) सांगतो, माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. त्यानंतर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 07:55 IST
Next Story
“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…”, मनसे पाडवा मेळाव्यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणे, “उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय..!”
Exit mobile version