अमरावती : अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे अप्पर वर्धा धरण काठोकाठ भरले असले, तरी योग्य वितरण व्यवस्थेअभावी शहराच्या अनेक भागांत टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याची हीच समस्या दूर करणारी महापालिकेची अमृत योजनाही रखडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाखांच्या घरात आहे. अप्पर वर्धा धरणातून १९९४ मध्ये शहर पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. त्या वेळी २०१६ मधील लोकसंख्या संकल्पित ठेवून दरदिवशी प्रतिमनुष्य १२० लिटर पाणी या प्रमाणात योजना तयार करण्यात आली होती. मूळ संकल्पनेत जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंगसाठी लागणारी यंत्रसामग्री २००१ च्या लोकसंख्येवर आधारित होती. पण शहराचे विस्तारीकरण झपाटय़ाने होत असल्याने या मूळ योजनेतील पंपिंग यंत्रसामग्री, जलशुद्धीकरण केंद्र, साठवण टाक्या अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत शहराच्या ११४.३५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला शासनाने २०१६ मध्ये मान्यता दिली आणि केंद्र आणि राज्य शासनाचा पहिल्या हप्तय़ाचा १४.४७ कोटी रुपयांचा निधी लगेच वितरितदेखील करण्यात आला. मुळात या प्रकल्पाचे कार्यादेश हे ऑक्टोबर २०१६ मध्ये देण्यात आले होते. एव्हाना ही योजना पूर्ण होणे अपेक्षित होते. निर्धारित अंतिम मुदत संपून गेली आहे. पण हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati municipal corporation s amrut water scheme stalled due to lack of proper distribution system zws
First published on: 26-01-2022 at 01:44 IST