राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची माहिती भाजपा खासदार अनिब बोंडे यांनी दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादसंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान; म्हणाले, “आजकाल टीव्ही लावला की…”!

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
prakash ambedkar
‘वंचित’ स्वंतंत्र लढणार! लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नागपूरमध्ये ‘या’ उमेदवाराला पाठिंबा
In North Maharashtra clash over Nashik in Mahayuti Only Nandurbar candidate announced in mahavikas aghadi
उत्तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये नाशिकवरून संघर्ष… महाआघाडीत केवळ नंदुरबार उमेदवार जाहीर… कोणते मुद्दे ठरणार कळीचे?

नेमकं काय म्हणाले अनिल बोंडे?

“’लव जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले, त्याचाही लव जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले आहे. मेळघाटातल्या आदिवासी मुलींना फसवून पळवून आणल्या जाते. जर मुलींना विरोध केला तर मुलींना जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना चिखलदरा तालुक्यातही समोर आली आहे. हे मुलं महाविद्यालयासमोर उभे राहुल मुलींवर लक्ष ठेवतात. तसेच फेसबुकच्या माध्यामातून मुलींशी संपर्क केला जातो. हे सर्व सुनियोजितपणे सुरू असते”, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

हेही वाचा – Vedanta Foxconn Project: “हा निर्णय बदलावा, प्रकल्प महाराष्ट्रात आणावा असं म्हटलं जातंय पण…”; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

“’लव जिहाद’वर खासगी विधेयक आणणार”

“’लव जिहाद’ संदर्भात मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मी येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहे. याबरोबरच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या पालकांना एक महिना आधी सुचना दिली जावी”, असेही खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.