सांगली : औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने तो आजही जिवंत आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या एकामागून एक नेत्याला येत असलेल्या ईडीच्या नोटीसीबद्दल आणि होत असलेल्या चौकशीबद्दल खदखद व्यक्त करत थेट ईडीवर टीका केली.

वाळवा तालुक्यातील बागणी येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून ग्राम पंचायत इमारतीवर उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात आ. मिटकरी बोलत होते. यावेळी आ. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Sharad pawar on Eknath khadse
‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

हेही वाचा – भाजपच्या वर्तणुकीमुळे शिंदे गटातील अस्वस्थतेला धुमारे

औरंगजेबाची कितीही आक्रमणे आली तरी कधीही छ. संभाजी महाराज डगमगले नाहीत. पोर्तुगिजांची, डचांची, इंग्रजांची, मोघलांची आक्रमणे झाली, पण संभाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. हेच रक्त आज तुमच्या-आमच्यामध्ये आहे. औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने तो आजही जिवंत आहे. त्यामुळे ईडीची कितीही आक्रमणे झाली तरी त्याला किंचितही शरण न जाणारा योद्धा म्हणून खा. शरद पवार आणि आ. पाटील यांच्याकडे आम्ही पाहतो. जे शरण गेलेत ते आता काही दिवसांनी शपथ घेतील. पण जे शरण गेले नाहीत त्यांना काही दिवस त्रास होत राहतो, मिटकरी म्हणाले.