भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर हल्ला केला आहे. करोना काळात राज्यातील तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. याकाळात राजेश टोपेंनी नुसत्या गप्प मारल्या आणि तीन लाख लोकांचा मृत्यू झाला, असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे. तसेच, केंद्रातील सरकारने लस दिल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा जीव वाचल्याचा दावाही लोणीकर यांनी केला आहे.

जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये ‘धन्यवाद मोदीजी अभियाना’ची माहिती देण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बबनराव लोणीकर बोलत होते. “करोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढून बारा कोटी लस विकत घेणार, असं राजेश टोपे सांगायचे. मात्र, रोज हा मुखडा टीव्हीवर यायचा, नुसत्या गप्पा मारल्या आणि तीन लाख लोकांचा राज्यात मृत्यू झाला,” असा आरोप लोणीकर यांनी केला आहे.

supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी
EPS-95 pensioner
इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”
satara lok sabha election marathi news, ncp satara marathi news
लोकसभेची जागा भाजपाला सोडण्यास साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोध, उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही नकार

हेही वाचा : “सहानुभूतीच्या नावावर मते मागितली, नंतर फटाके फोडले” मुरजी पटेलांची ऋतुजा लटकेंवर टीका

“राजेश टोपे पहिल्या दिवशी सांगायचे लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, नंतर म्हणायचे मोदीजी लस देत नाहीत. मग केंद्र सरकारने लस दिली नसती तर, अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता. लबाड लांडग ढोंड करत, लस आणण्याचे सोंग करतं,” असा राजेश टोपेंचा कारभार असल्याची टीका बबनराव लोणीकर यांनी केली आहे.