महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र, हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबतही भाष्य केलं. ते नागरपूरमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण; संजय राऊत म्हणाले, “शिवसेना ही…”

patanjali ayurved marathi news, patanjali ayurved supreme court notice marathi news, baba ramdev supreme court notice marathi news
विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

काय म्हणाले बच्चू कडू?

आम्ही या प्रकरणाचा आधीच अभ्यास केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित नियोजन करून ठेवलं होते. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आम्ही बंड केलं. त्यामुळे १०० टक्के सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वास बच्चू कडून यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील युक्तिवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

शिंदे गटाला कायदेशीर अडचण येणार नाही

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबतही भाष्य केले. महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात चुका केल्या. आधी त्यांनी कारण नसताना विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा घेतला. त्यानंतर अविश्वास प्रस्ताव यायच्या आधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे शिंदे गटाला कायदेशीर अडचण येणार नाही. महाविकास आघाडीनं शिंदे गटासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या करून ठेवल्या. कायदेशीर बाबी लक्षात घेऊनच एकनाथ शिंदेंनी बंड केलं. कायद्याच्या बाहेर कोणतीही गोष्ट केली नाही, असे ते म्हणाले.