scorecardresearch

Premium

“मणिपूर घटनेप्रकरणी भाजपाच्या मनात गुन्हेगारी भावना, म्हणूनच त्यांनी…”, बाळासाहेब थोरातांचा टोला

विधानसभेच्या अध्यक्षांनी मणिपूरमधील घटनेवर बोलण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे विधानसभेचं कामकाज सुरू असताना विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

Balasaheb Thorat (1)
बाळासाहेब थोरात

मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज (२१ जुलै) या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांमधील महिला आमदारांनी मणिपूर प्रकरणावर बोलण्याची परवानगी मागितली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यामुळे काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध नोंदवला. तसेच त्यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षातील इतर आमदारांनीही सभात्याग केला.

मणिपूरमधील घटनेवर बोलू न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आमदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, मणिपूरमध्ये घडलेली घटना ही केवळ मणिपूरची आहे असं म्हणता येणार नाही. अडीच महिने याप्रकरणी गुन्हादेखील नोंदवण्यात आला नव्हता. कोणतीही कारवाई केली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हालचाल सुरू झाली. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे. काही लोक ही घटना लोकांपासून लपवून ठेवू पाहत होते.

Ajit Pawar group washim
वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात नाराजीनाट्य! सहकारमंत्र्यांच्या समोरच…
Jayant Patil
“महाराष्ट्रात नको असलेल्या नेत्यांना…”, लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या योजनेवरून जयंत पाटलांचा टोला
Rahul-Narvekar-on-Shivsena-rebel-MLA
“बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लाईव्ह दाखवा”, सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याची मागणी
Women MP in Rajya Sabha Chairwomen
‘सभापती महोदया’…; राज्यसभेच्या कामकाजाची जबाबदारी महिलांवर; विधेयकाच्या चर्चेसाठी वेगळा प्रयोग

हे ही वाचा >> “मगरीचे अश्रू आता…”, मणिपूर घटनेवरील पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर संजय राऊतांचा संताप

बाळासाहेब थोरात म्हणाले, काल (२० जुलै) या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. परंतु ते संसदेबाहेर येऊन बोलले. ते संसदेत याविषयी काहीच बोलले नाहीत. मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर ही घटना खूप गंभीर आहे. या घटनेमुळे जगभर आपल्या देशाची छी-तू होत आहे. आज या विषयावर आमच्या महिला आमदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही. पाच मिनिटंसुद्धा त्यांनी दिली नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाच्या मनात या घटनेप्रकरणी आपण गुन्हेगार असल्याची भावना आहे. त्याचाच हा सगळा परिणाम आहे. म्हणून महिला आमदारांना विधानसभेत त्यांनी बोलू दिलं नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Balasaheb thorat says bjp feels they are criminals in manipur violence asc

First published on: 21-07-2023 at 16:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×