शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला, अशा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला होता. दरम्यान, राऊतांच्या आरोपाला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Maharashtra Breaking News Live : “शिवजयंती केवळ हार घालण्यापुरती मर्यादीत ठेऊ नका, तर…”; राज ठाकरेंचा VJTI महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Sanjay Shirsat On Sharad Pawar
संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के नाही तर…”
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

काय म्हणाले केशव उपाध्ये?

खासदार संजय राऊतांच्या आरोपावर बोलताना, “संजय राऊत किती घसरणार? गेल्या दोन अडीच वर्षाच नुसती बेछूट आरोपांची राळ उडवली आहे. एक आरोप ठोस सिद्ध करू शकले नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करून चेष्टेचा विषय होतो, म्हणून इतकही हसू करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे?”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “देशात आजही ‘पेगासस’चा वापर सुरू”; संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, “देशातील प्रमुख उद्योगपती…”

संजय राऊतांनी नेमके काय आरोप केले?

आज सकाळी माध्यमांशी बोलताना, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. “माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत दोन हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असे ते म्हणाले होते. तसेच याबाबत लवकरच पुरावे देऊ, महाराष्ट्राला ते लवकरच समजेल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.