मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासंदर्भात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये देखील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे आणि मनसे अयोध्या दौऱ्यावर ठाम असताना बृजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जून रोजी नेमकं अयोध्येत काय घडणार? याविषयी उत्सुकता वाढू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ते बिळात राहतात, पहिल्यांदाच बाहेर येतायत”

बृजभूषण सिंह यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. “मी म्हणतो राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाही. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाही. पहिल्यांदा ते आले आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर घुसू देणार नाही. आणि जर म्हटलंय तर घुसू देणारच नाही. हे योग्य आहे की अयोग्य ते येणारा काळच ठरवेल”, असं बृजभूषण सिंह यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brijbhushan shingh challenge raj thackeray ayodhya visit mns pmw
First published on: 17-05-2022 at 17:05 IST