सातारा: महाविकास आघाडीकडे निवडून येण्याआधी सर्वजण मुख्यमंत्रिपदासाठी भांडत आहेत. त्यांचे पाय एकमेकांमध्येच अडकणार आहेत आणि त्यातूनच त्यांचा पराभव होणार आहे. ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. स्वार्थासाठी झालेली आघाडी असल्याने बिघाडी तर होणारच, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरे (ता महाबळेश्वर) या त्यांच्या गावी आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली, तरी विरोधक मुख्यमंत्रिपद आणि जागावाटपामध्ये अडकले आहेत. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसायला लागला आहे. पराभव दिसू लागला, की मग दुसऱ्यांच्या त्रुटी शोधायला सुरुवात होते. त्यामुळे ते मतदारयादीमध्ये घोळ, महायुतीच्या विकासकामांमध्ये त्रुटी शोधत आहेत. महायुतीची सत्ता येणार असल्याने मुख्यमंत्री नव्हे, तर विरोधकांनी विरोधी पक्षनेता ठरवावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?

हेही वाचा >>>Sushma Andhare on Election : पुण्यात नवी कार्यालये, बैठकांनाही जोर; सुषमा अंधारे निवडणूक लढवणार का? म्हणाल्या, “माझी अपेक्षा…”

शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्षात जयंत पाटील आता पुढे पुढे करत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि पवार कुटुंबीयांना ते पचनी पडताना दिसेलच असे नाही. त्यामुळे या विषयी जास्त न बोललेले बरे. वेळ आल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येतील, अशी टिप्पणी करत मुख्यमंत्री म्हणाले, की महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमच्यात कोणताही वाद नाही. आम्ही निवडून येण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. कुणाला किती जागा हे ठरवले जाईल. मागील दोन वर्षांमध्ये ४६ हजार कोटींच्या विविध योजना बळीराजासाठी केल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ ही यशस्वी झालेली योजना आहे. अनेक योजना या सरकारने सुरू केल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातील जनता देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Story img Loader