scorecardresearch

Premium

Monsoon Session: “…नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल”, बाळासाहेब थोरातांनी विधानसभेतच दिला इशारा!

थोरात म्हणतात, “एका वर्षभरात फक्त पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून एक लाख वीस हजार कोटी रुपये वाटप केले जातात हे…!”

balasaheb thorat ajit pawar
बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारवर हल्लाबोल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत थेट सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. आपल्याला पक्षाच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवार गटाने केला आहे. याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात पडत असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलून सत्ताधारी आमदारांनाच निधीवाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून अधिवेशनात दोन्ही बाजूंनी खडाजंगी चालू असताना काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“राज्य सरकारने ज्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहेत. ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने अन्याय दूर करावा. अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल”, असा थेट इशारा बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत बोलताना दिला.

elgar parishad to reduce tension between maratha and obc community prakash ambedkar claim before commission
Maharashtra Breaking News : “ग्रामसेवक भरतीतून टीसीआय कंपनीला १२० कोटी रुपयांचा फायदा”, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, म्हणाले…
nandurbar dr vijay kumar gavit, dr vijay kumar gavit on dhangar reservation, dr vijay kumar gavit on tribal reservation
धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण नाही, डाॅ. विजयकुमार गावित यांची ग्वाही
What Manoj Jarange Patil Said?
मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडे ‘या’ पाच मागण्या आणि दिला इशारा, म्हणाले..
meeting for maratha reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बोलाविलेली सर्वपक्षीय बैठक ठोस निर्णयाविना; जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन

वर्षभरात १ लाख २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

“सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. या एक वर्षात आपण चार अधिवेशने केली. मागच्या पावसाळी अधिवेशनात आपण २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ५२ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्या आणि या अधिवेशनामध्ये ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारने सादर केल्या आहे. एका वर्षभरात फक्त पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून एक लाख वीस हजार कोटी रुपये वाटप केले जातात हे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. एकूण अर्थसंकल्पाच्या पाच ते दहा टक्के पुरवणी मागण्या असाव्या असा संकेत आहे. मात्र हा संकेत या सरकारने पायदळी तुडवला आहे”, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

“कुणी म्हटलं की मशिदीसमोर आम्हाला नाचायचंय, तर…”, देवेंद्र फडणवीसांची त्र्यंबकेश्वर प्रकरणी भूमिका!

दरम्यान, यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निधीवाटप करण्यात आलेली यादीच सभागृहात सादर केली. “आपण ६५ टक्के निधी सत्तेत सहभागी असलेल्या १०० आमदारांना दिलेला आहे. ७४२ कोटी, ५८० कोटी, ४८२ कोटी, ४५६ कोटी, ४३६ कोटी, ३९२ कोटी या सगळ्या शेकडो कोटीतल्या रकमा आहेत. ज्यांना आपण मंत्री करु शकत नाही त्यांना आपण भरघोस निधी दिल्याचे दिसून येते. एका जिल्ह्यात एकाच मतदारसंघात ७३५ कोटी आणि बाकी संपूर्ण जिल्ह्यासाठी २१५ कोटी देण्यात आले आहेत”, असं थोरात म्हणाले.

“सरकारकडे पुरवणी मागण्यांसाठी १ लाख २५ हजार कोटी आहेत आणि स्थगिती उठविण्यासाठी २ हजार कोटी शिल्लक नाही, हा कसला न्याय? ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. मात्र दुसऱ्या बाजूला एकट्या अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला सहाशे वीस कोटी रुपये अदा करणे बाकी आहे. राज्यभर हा आकडा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याची चर्चा आहे”, असंही थोरात यावेळी म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader balasaheb thorat slams government in maharashtra assembly monsoon session pmw

First published on: 24-07-2023 at 17:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×