राज्यात आज दिवसभरात ३ हजार २९ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २ हजार ८४४ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ६० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६५,२७७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४४,६०६ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८९६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८४,२९,८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४४,६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,५४,९८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३६,७९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.