राज्यात आज दिवसभरात ३ हजार २९२ रूग्ण करोनामधून बरे झाले आहेत. तर, ३ हजार २०६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर ३६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६४,०२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२४ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४४,३२५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८८७० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८१,५८,००० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४४,३२५ (११.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,६१,०७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३७,८६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.