scorecardresearch

Premium

Covid 19 : “अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल” ; आरोग्यमंत्री टोपेंचं विधान

राज्यात दिवसभरात ५ हजारांपेक्षाही अधिक नवीन करोना रूग्ण आढळले असल्याची देखील दिली माहिती

Mental Hospitals, Maharashtra
(संग्रहित छायाचित्र)

राज्यात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढीस लागला आहे. आज दिवसभरात राज्यात पाच हजारांपेक्षाही जास्त नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने सावधगिरीच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. आज टास्क फोर्सची देखील बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, “राज्यात आज ५ हजार ३६८ हे आजच पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेले आहेत. काल ३ हजार ९०० होते आणि आज जवळपास साडेपाच हजार आढळले आहेत. मुंबईत काल साधारण २२०० च्या दरम्या होते, आज चार हजाराच्या दरम्यान आढळले आहेत. जवळजवळ एक दिवसाआड म्हणजे दोन दिवसात दुप्पट संख्या होत आहे. मुंबईची आजची दिवसभरातील जी पॉझिटिव्हिटी आहे ती ८.४८ टक्के आहे, ठाण्याची देखील आजची पॉझिटिव्हीटी ५.२५ टक्के आहे. रायगडची ४ टक्के आहे. पालघरची ३ टक्के आहे आणि पुण्याची ४.१४ टक्के आहे. याचा अर्थ असा आहे की साधारण १०० तपासण्या केल्या तर त्यामध्ये अशा स्वरूपात पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत.”

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

तसेच, “त्यामळे निश्चितप्रकारे जे एक दिवसाआड दुप्पट होण्याची जी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे, तो नक्कीच थोडी चिंता वाढवणार विषय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स आणि सर्वांनी जी काही चर्चा केली. त्यामध्ये काय उपाय करावे किंवा निर्बंध या निमित्त करणे गरजेचे आहेत. या सगळ्या संदर्भात खूप सविस्तर चर्चा झालेली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल. त्या संदर्भात जी चर्चेतील मुद्दे आहेत, त्या मुद्य्यांवरून तो निर्णय घेतल्या जाण्याच्या दृष्टीकोनातू कार्यवाही होईल.”

…तर महाराष्ट्रात लॉकडाउन लावावा लागेल; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान

याचबरोबर, “हे नक्कीच आहे की कुठेही ज्या ठिकाणी हॉल्स आहेत, गर्दी आहे त्या ठिकाणी गर्दी टाळलीच पाहिजे आणि गर्दी नकोच हाच एक सूर सर्वसाधरणपणे आहे. तो नको कारण त्यामुळेच संक्रमण अधिक झपाट्याने वाढले हे सर्वसाधरणपणे सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीकोनातून योग्य तो निर्णय घेण्याचा निर्णय होऊ शकेल.” याशिवाय, “दुसरा महत्वाचा विषय असा आहे की, साधारणपणे आता चाचण्या कशा कराव्यात? तर चाचण्यांच्या संदर्भात एसजीटीएफ हे जे कीट आहे ते मोठ्यासंख्येने आपण या दहा-पंधरा दिवसात वापरावं आणि आज जे पॉझिटिव्ह येत आहेत, त्यामध्ये डेल्टा किती आणि ओमायक्रॉन किती याचं अचूक निदान हे या एसजीटीएफ कीटच्या माध्यमातून होऊ शकले.” असंही आरोग्यमंत्री टोपेंनी यावेळी बोलून दाखवलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 the final decision will be taken by the chief minister he will have to take it today and tomorrow statement of health minister tope msr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×