यवतमाळ : देशात गुन्हेगार महत्वाचे आहेत काय, पोलीस नाही काय?, असा प्रश्न विचारत बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. विष्णू सखाराम कोरडे (५४) असे मृत पोलीस जमादाराचे नाव आहे. कोरडे यांनी आपल्या आत्महत्येस जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप मृत्यूपूर्व चिठ्ठीत केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुसद येथील रहिवासी असलेले विष्णू कोरडे हे यवतमाळ पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ते महागाव येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात निलंबित झाल्याने त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलीस मुख्यालयात करण्यात आली. चौकशीनंतर बिटरगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. दरम्यान, कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात होऊन, मणक्यास जबर मार लागला. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने त्यांनी पुसद येथे बदली करण्याची तसेच वैद्यकीय देयके मंजूर करण्याची विनंती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे केली होती. मात्र अधीक्षकांनी बदलीही केली नाही आणि वैद्यकीय देयकांवर स्वाक्षरीही केली नाही, असा आरोप कोरडे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminals important country police jamadar commits suicide accusing superintendent police amy
First published on: 17-06-2022 at 16:55 IST