कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सकडून टीका केली होती. एक मुख्यमंत्री आमची गावं खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरे राज्य आमचे उद्योग खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुमचा स्वाभिमान कोठे शेण खायला गेलाय का? असे संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान, राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते कोल्हापुरात पत्राकारांशी बोलत होते.

हेही वाचा – मनसेची मोठी घोषणा, राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर-कोकण दौऱ्यावर जाणार, कधी-कुठे? वाचा…

Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“संजय राऊतांएवढं वाईट महाराष्ट्रात कोणीही बोलू शकत नाही. ते एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. एकीकडे आपण मराठी भाषेचा गौरव, अभिमान याविषयी बोलतो आणि दुसरीकडे मराठी भाषेतील वाईट शब्द लोकांना दाखवले, तर तुम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे का? हा प्रश्नही पडतो”, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.

हेही वाचा – “राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या”; शिवरायांबद्दलच्या विधानावरुन पवारांचा संताप! म्हणाले, “अशा व्यक्तीला…”

“संजय राऊत काय बोलतात याकडे फारसं गांभीर्याने बघायची गरज नाही. आधी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार हा एकच त्यांच्याकडे मुद्दा होता. आता त्यांनी पाच तुकडे करतील अशा नवीन मुद्दा काढला आहे. शेवटी सत्ता गेल्यानंतर माणूस काहाही बोलू लागतो, अशी गत ठाकरे गटाची झाली आहे. त्यामुळे ते काहीही विधान करत असतात”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात बेबनाव…’; काँग्रेस नेत्याचं विधान!

यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरही प्रतिक्रिया दिली. “आज सत्ता गेल्यानंतर तुम्हाला वेगळ्या विचारसरणीचे लोक जवळचे वाटत आहेत. ज्यांनी रथयात्रा रोखली होती, त्या राज्यात जाता आणि लोटांगण घालता? यापेक्षा दुसरं दुर्देवं नाही. राम मंदिरासाठी असलेली हिंदूंची रथयात्रा ज्या माणसाने अडवली, त्यांच्याच मुलाला जाऊन तुम्ही भेटता. यावरून सत्तेपुढे तुम्ही किती लोटांगण घालता, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले आहे. मराठी माणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही” , अशी टीकाही त्यांनी केली.