युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ यात्रेचा पुढील टप्पा सोमवारी ( ७ फेब्रुवारी ) नाशिकमधून सुरु झाला. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मी ठाण्यातून लढतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. याला शिंदे गटाचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मुख्यमंत्री घाबरले आहेत. त्यांना वरळीतून लढायचं नसेल, तर आमदारकी आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मी ठाण्यातून लढतो. सध्या महाराष्ट्रातील वातावरण इतकं पेटलं आहे की, निवडणूक झाली तर एकच रंग दिसेल; तो फक्त भगवा, भगवा आणि भगवा. आता लोक विचारतील, भगवा रंग कोणाचा? कोणत्या गटाचा? त्यांना सांगू इच्छितो की भगवा रंग शिवसेनेचा,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
supriya sule ajit pawar
“साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या”, अजित पवारांच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान

हेही वाचा : बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

“आम्ही कोणाला खिजवत नाही, पण…”

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलेल्या आव्हानंतर दीपक केसकरांनी ‘डिपॉजिट’ वाचवण्याचा सल्ला दिला आहे. “आदित्य ठाकरेंनी आवश्य ठाण्यात यावं, आम्ही कोणाला खिजवत नाही. पण, आदित्य ठाकरेंनी आपली अनामत रक्कम ( डिपॉजिट ) वाचवून दाखवावं. एक ते दीड वर्षात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत,” असं दीपक केसरकरांनी म्हटलं.

हेही वाचा : “मी असलं घाणेरडं राजकारण कधीही…”, बाळासाहेब थोरात प्रकरणावर नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया!

“राजकीय दृष्ट्या ही निवडणूक ती निवडणूक लढवेल, असं…”

“आदित्य ठाकरेंनी मंत्री असताना स्वत:चं कर्तव्य पाडलं नाही. मग, राजकीय दृष्ट्या ही निवडणूक ती निवडणूक लढवेल, असं म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे का? ज्यांना निवडून येण्यासाठी दोघांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं. हे केल्यानंतर ते आमदार झाले,” असा टोला दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला.