“देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे.” असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही. जे विधान मी करतो त्याचे माझ्याजवळ नेहमीच पुरावे असतात, आता ती वेळ नाही योग्यवेळी सगळ्या गोष्टी सांगेन.”

deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
in Bhandara Campaigning Raises Questions on Nitin Gadkari that doing Self Promotion or candidate sunil mendhe s pramotion
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी की स्वतःच्या?
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर
BJP leader Shobha Karandlaje election commission
बॉम्बस्फोटाप्रकरणी वादग्रस्त विधानावर कारवाई, कोण आहेत ‘या’ भाजपाच्या खासदार?

याचबरोबर नामांतराबाबत बोलताना फडणवीस म्हणाले “मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो, की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जो निर्णय घेतला होता की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव कारायंच त्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार काल अधिसूचना काढलेली आहे. ही अधिसूचना काढल्यानंतर आता जिल्ह्याचं नाव बदलण्याची अधिसूचना महसूल विभाग काढेल आणि महानगरपालिका व नगरपालिका नाव बदलण्याचं नोटीफिकेशन हे नगरविकास विभाग काढेल. या दोन्ही नोटीफिकेशनची तयारी झालेली आहे. सुट्टी आल्यामुळे ते कदाचित आज उद्या निघू शकणार नाहीत, ते सोमवारी निघतील. तसा आजही काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे यात कुठलाही गोंधळ नाही. नाव जे बदललं आहे ते शहर, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांचच बदलल आहे.”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? –

भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो.” असं राऊत म्हणाले आहेत.