चिपळूण : कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने चिपळूण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असलाच पाहिजे असे शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रदूषण वाढवून कोकणातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेती व मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम करणारे प्रकल्प सरकार सहन करणार नाही असे त्यांनी नमूद केले.

