औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर राज्य सरकारने ५ दिवस या कबरीवर जाण्यास मज्जाव केलाय. यावर विचारलं असता भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणं राजद्रोह आहे, तर औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणं राजशिष्टाचार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते नवी दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणं राजद्रोह आहे, तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणं हा राजशिष्टाचार आहे. त्यांनाच संरक्षण आहे, इतर कोणालाही संरक्षण नाही.”

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाराष्ट्राला ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेशच्या आधी न्याय मिळू शकला असता, कारण मध्य प्रदेशने जे केलं ते करा म्हणून आम्ही मागील २ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारला सांगत आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ टाईमपास केला. कमिशन तयार केलं त्याला पैसे दिले नाहीत.”

“कमिशनने स्वतः सांगितलं की आम्हाला एक पैसा दिला नाही, स्टाफ दिला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशने जो रिपोर्ट ६ महिन्यात तयार केला तो महाराष्ट्राला २ वर्षे तयार करता आला नाही. न्यायालयाने कालही हेच सांगितलं की महाराष्ट्रासह ज्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे त्या राज्यांनी रिपोर्ट तयार करावा आणि ओबीसी आरक्षण द्यावं,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

२०२४ च्या तयारीसाठी ज्ञानवापीचा मुद्दा असल्याची राऊतांची टीका, फडणवीस म्हणाले….

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. ते म्हणाले, “संजय राऊत रोजच टीका करतात. त्यांनी आम्ही महत्त्व देत नाही. तो महत्त्वाचा माणूस नाही.”

“ज्ञानवापीच्या राजकीय परिणामांचा आम्ही विचार करत नाही. हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेचा विषय राजकारणाच्या पलिकडील असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जात आहेत. ही देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. न्यायालयाने आज कोर्ट कमिशनर नियुक्त केला. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्यावर न्यायालय जो निर्णय देईल तो अत्यंत महत्त्वाचा असेल,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

“हे प्रकरण न्यायालयात असल्याने आपण त्यावर फार वाद करणं योग्य नाही. मात्र, हे खरंच आहे. आपल्या सर्वांना हा इतिहास माहिती आहे की कशाप्रकारे मंदिरांवर आक्रमणं करून औरंगजेबाने ते मंदिर कसं तोडलं होतं,” असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे यांना मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं. आता संभाजीराजेंना भाजपाचा पाठिंबा द्यायचा की नाही याचा राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर निर्णय होईल. त्यामुळे याबाबत जो योग्य निर्णय असेल तो सांगू.”

हेही वाचा : …तुझको मिरची लगी तो मै क्या करू? – देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल!

“भाजपाचे राज्यसभेत दोन खासदार अगदी स्पष्टपणे निवडून येतात. आमच्याकडे मतं आहेत, आणखी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या संदर्भातील भाजपाचे सर्व निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेऊ,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.