देशातील ९ विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रिय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याची तक्रार केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (५ मार्च) अमरावतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. मोदींच्या राज्यात ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत, गैरकारभार-भ्रष्टाचार करत आहेत अशांना शिक्षा देण्याचं काम या यंत्रणा करत आहेत. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही.”

Vijay Vadettiwars challenge to Dharmaraobaba Atram
“भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे दिल्यास राजकारण सोडणार, अन्यथा तुम्ही सोडा,” विजय वडेट्टीवार यांचे धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
PM Narendra Modi on Supreme court cji letter from lawyers
‘घाबरवणं-धमकावणं ही काँग्रेसची संस्कृती’, सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
mumbai, devendra fadnavis marathi news, personal assistant of dcm devendra fadnavis marathi news
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून १५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक

“पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होणार नाही”

“त्यामुळे असं कोणतंही पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होईल, असं मला वाटत नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हा भ्रष्टाचार त्यांनी बंद करावा,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “अजित पवारांनी सकाळी साखर झोपेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा…”, अधिवेशनात एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या का?

भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या या विरोधकांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले, “आरोप करणाऱ्यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या असं एखादं उदाहरण दाखवावं. कुणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपात असा किंवा कुठेही असा, ज्याने चूक केली त्याची चौकशी होईल. एखाद्यावर चुकीची कारवाई झाली असेल, तर न्यायालय आहे.न्यायालय निश्चितपणे न्याय देईल.”