scorecardresearch

Premium

“मंत्र्यांचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर मग शेतकऱ्यांनाही परवानगी द्या” – देवेंद्र फडणवीस

यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, अशी खोचक टीकाही फडणवीसांनी केली.

या सरकारचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे खंडणी वसुली, असं विधानही त्यांनी केलं आहे.
या सरकारचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे खंडणी वसुली, असं विधानही त्यांनी केलं आहे.

राज्यातल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आता दिसत आहे. सत्ताधारी-विरोधकांच्यात या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांचं सत्र जोरात चाललेलं दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज हजेरी लावली. त्यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडीतले लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था त्यांनी वाईट करुन टाकली आहे, अशी टीका आज फडणवीस यांनी केली.

यासोबत त्यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरही अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील”.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा – “बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशा आशयाची टीका करत त्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथं आहेत”.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis on nawab malik weed farming herbal tobacco vsk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×