scorecardresearch

“…तर तुमची तिरडी बांधली जाईल”, हिंदूराष्ट्राची मागणी करताना धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींनी उत्तर दिलं आहे.

Bageshwar Dham Dheerendra Shastri
धीरेंद्रशास्त्री यांचं वादग्रस्त वक्तव्य

पुण्यात सोमवार ते बुधवार हे तीन दिवस बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग व दरबार कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. धीरेंद्र शास्त्री हे सत्संग आणि दरबारच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्यावर महाराष्ट्र अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत हिंदूराष्ट्राची मागणी केली आहे.

भारतीय संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. हिंदूराष्ट्रासाठी आणखी एकदा घटनादुरुस्ती झाली तर काय बिघडलं, अशा आशयाचं विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis and Supriya Sule
“भाजपा देवेंद्र फडणवीसांवर अन्याय करत आहे, याच्या वेदना…”, सुप्रिया सुळेंचं विधान
Prakash Ambedkar on government recruitment
“…तर आम्ही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘पर्मनंट’ करू”, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
meeting of foreign ministers of brics countries held in cape town
भारत-कॅनडात संवाद हवा, दहशतवादाची समस्या सोडवावी; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

हिंदूराष्ट्राच्या मागणीबाबत विचारलं असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला आहे. मीही संविधानाचा स्वीकार करतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे. पण सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल.”

हेही वाचा- VIDEO: “२१ लाख रुपयांचं बक्षीस देऊ, तुम्ही फक्त…”; पुण्यात अंनिसचं धीरेंद्र शास्त्रींना थेट आव्हान, म्हणाले…

हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? असा प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “त्यांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता… हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही… हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dheerendra shatri alias bageshwar baba press confference in pune demand constitutional amendment for hindu nation rmm

First published on: 20-11-2023 at 22:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×