पुणे : आजाराची लक्षणे आणि परिणामांपूर्वीच ज्या आजाराचे नावच रुग्णांना धडकी भरवते तो आजार म्हणजे कर्करोग. मागील काही वर्षांमध्ये कर्करोगावर औषधे आली, प्रतिबंधात्मक चाचण्याही विकसित झाल्या, मात्र आजही कर्करोगाचे निदान करणे हे आव्हानात्मक आहे. बहुतांश प्रकारच्या कर्करोगांचे निदान हे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होत असल्याने ते आजही जीवघेणे कर्करोग ठरतात. रक्ताचे कर्करोग, पोटातील विविध प्रकारचे कर्करोग,  स्वादुपिंडाचा, त्वचेचा कर्करोग हे यांपैकी काही प्रमुख कर्करोग आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील सर्वच देशांसमोर कर्करोग या आजाराचे आव्हान आहे. भारतही त्याला अपवाद नाही. भारतातील नऊपैकी एका व्यक्तीला त्याच्या हयातीत कर्करोग होण्याची शक्यता जागतिक अहवालांवरून वर्तवली जाते. महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारे स्तनांचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग, मुलांमध्ये ल्युकेमिया अशा कर्करोगांचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२५ पर्यंत २०२० च्या तुलनेत भारतातील कर्करुग्णांचे प्रमाण १२.८ टक्के एवढे वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कर्करोगाचे अक्षरश: शेकडो प्रकार दिसून येतात. प्रामुख्याने महिलांमध्ये आढळणारा स्तनांचा कर्करोग हा लवकर निदान झाले तर बरा होतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक लसही आता उपलब्ध आहे. मात्र बहुतांश कर्करोग हे केवळ उशिरा निदान या एका कारणास्तव बरे होण्यापलीकडे जातात. त्यांमध्ये प्रामुख्याने पोटाच्या कर्करोगाचे विविध प्रकार, स्वादुपिंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा तसेच आतडय़ांचा कर्करोग, त्वचेचे आणि रक्ताचे कर्करोग यांचे प्रमाण अधिक आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diagnosing cancer is challenging says experts zws
First published on: 06-02-2023 at 04:30 IST