रत्नागिरी- पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येथील प्रसिध्द गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर नेमलेल्या आठ सुरक्षारक्षकांना ग्रामपंचायतीने निधीअभावी सेवेतून बडतर्फ केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या किनाऱ्यावर हौशी पर्यटक बुडाल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय असते, हे लक्षात घेता या समस्येवर तातडीने तोडगा निघाला नाही तर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेऊन येथील समुद्रकिनाऱ्यावर १० सुरक्षारक्षकांची  नियुक्ती केली. पर्यटकांकडून कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून या रक्षकांना मानधन देण्याची व्यवस्था केली आहे. परंतु नाताळनंतर चालू महिन्यात पर्यटकांचा ओघ कमी झाल्यामुळे कराचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, जीवरक्षकांच्या मानधनासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने दहापैकी आठजणांना काम थांबवण्याची सूचना दिली आहे. पण उर्वरित दोघांनीही, त्या आठजणांना पुन्हा कामावर घेतल्याशिवाय काम करण्यास नकार दिला. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सध्या एकही जीवरक्षक राहिलेला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to lack of life saving funds on the beach at ganpatipule for the safety of tourists from bad service to badass akp
First published on: 22-01-2022 at 00:15 IST