केंद्र सरकारने इथेनॉलबाबत चांगले धोरण आणलं आहे. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के सुद्धा इथेनॉलचे मिश्रण केले जात नसायचं. आता सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार मार्च २०२३ साली २० टक्के तर मार्च २०२५ साली २५ टक्के इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे २० ते २५ रुपयांनी पेट्रोल ग्राहकांना स्वस्त मिळेल, अशी माहिती भाजपाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, “देशात कच्च्या तेलासाठी दीड ते दोन लाख कोटींची परकीय गुंतवणूक करावी लागते. ती इथेनॉलच्या निर्मितीमुळे थांबणार आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने ५०० कोटी लीटर इथेनॉलच्या निवीदा काढल्या होत्या. त्यातील ४१० कोटी लीटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला. तर, १७० कोटी लीटर इथेनॉलचा पुरवठा फक्त महाराष्ट्राने केला आहे. साखर कारखाने हे इंधन निर्मितीचे स्रोत बनले आहेत,” असेही पाटील यांनी सांगितलं.

Low back pain: How to fix your posture and straighten your spine
Low back pain: पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय
anand mahindra happy with the intelligence of the girl offered her a job she had saved her sister life through alexa
VIDEO : … म्हणून आनंद महिंद्रांनी १३ वर्षांच्या मुलीला दिली नोकरीची ऑफर; म्हणाले, जर कॉर्पोरेट क्षेत्रात…
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

“देशात महाराष्ट्रातून ३० टक्के इथेनॉल पुरवले जाते. तर, २५ टक्के उत्तर प्रदेश, २० टक्के कर्नाटक, १० टक्के इथेनॉलचा गुजरातमधून पुरवठा होतो. जम्मू-काश्मीर, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेशमध्ये साखर कारखान्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे त्या राज्यांना महाराष्ट्रातून इथेनॉल पुरवठा करावा लागेल,” असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.