पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदीच्या दाखल्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट पासून सुरू –

राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र, योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीतील नोंद सक्तीची असल्याने योजनेत सहभाग घेता येत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. पण, अशी कोणतीही सक्ती नाही. शेतकऱ्यांना पिकाचे स्वयंघोषणापत्र जोडून पीकविमा योजनेत सहभागी होता येईल. राज्य सरकारच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होत आहे, त्या वेळी आपल्या पिकाची नोंद करावी, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

योग्य नोंद ई-पीक पाहणीत करणे आवश्यक –

“स्वयंघोषणा पत्र देऊन पीकविमा योजनेत भाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीत आपल्या पिकाची नोंद करावयाची आहे. विम्यासाठी नोंद केलेले क्षेत्र आणि ई-पीक पाहणीतील क्षेत्रात तफावत आढळून आल्यास ई-पीक पाहणीतील क्षेत्र अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत ज्या पिकासाठी सहभाग घेतला आहे, त्याची योग्य नोंद ई-पीक पाहणीत करणे आवश्यक आहे.”, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.