राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून थोडक्यात बचावल्या असून, सुखरुप आहेत. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला आज (१० जुलै) भरधाव टेम्पोनं पाठीमागून धडक दिली. वर्षा गायकवाड यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाबरोबरच हिंगोलीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. हिंगोलीच्या दिशेनं जात असतानाच हा अपघात झाला. मात्र, याबाबत वर्षा गायकवाड यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या पालकमंत्री असून, त्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यावर असतानाच त्यांच्या कारला टेम्पोनं मागच्या बाजूनं धडक दिल्याची माहिती समोर आली. या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूनं नुकसान झालं. सुदैवानं या अपघातात वर्षा गायकवाड यांच्यासह कुणालाही दुखापत झाली नाही.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Pakistan former Prime Minister Imran Khan
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा, १४ वर्षांच्या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

ऑक्सिजन प्रकल्पाच्या निमित्ताने राजीव सातव यांच्या कार्याला दिला उजाळा

हिंगोलीत वाढत्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे स्व. नेते राजीव सातव यांच्या कार्याला उजाळा दिला. “करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन क्षमतेत वाढ करणे आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी माझे बंधू स्वर्गीय राजीवजी सातव यांनी अतोनात प्रयत्न केले होते. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्यावर आमचा भर आहे. आणखी पाच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. राजीवजी यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देऊ,” असं वर्षा गायकवाड यांवेळी म्हणाल्या.

वर्षा गायकवाड दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी विविध विषय आणि प्रश्नांसंदर्भात बैठकाही घेतल्या. हिंगोली जिल्ह्यात खेळाडूंच्या सोयीसाठी नव्याने जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. या दौऱ्यात पालकमत्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्याचबरोबर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी निघाल्या असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला.