“स्वप्न तर खूप आहेत, पण ती पूर्ण करणे शक्य होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता. पण आता मला आर्थिक संकटामुळे मोलमजुरी करावी लागते आहे.” अशी शब्दांमध्ये वयाच्या १५ व्या वर्षी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळवणारा एजाज नदाफ हा आपली व्यथा मांडतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या एजाज मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवतो आहे. मोठे धैर्य दाखवून दाखवत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे २०१८ मध्ये नदीच्या वाहत्या प्रवाहात एजाजने दोन मुलींचा जीव वाचवला होता. एजाज नदाफ या शाळकरी विद्यार्थ्याला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते २०१८ मध्ये राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी एजाज हा केवळ १५ वर्षांचा होता, तो पार्डी येथील रहिवासी असून सध्या त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी केळीच्या गाडीवर मजुरी करावी लागते आहे. एजाज मोलमजुरी करुन दिवसाला केवळ ३०० रुपये कमवतो आहे. अत्यंत गरीब परिवारात जन्मलेल्या एजाज नदाफचे आई-वडील शेतात मजुरी करतात. त्याच्याकडे बारावीच्या परीक्षेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले. यंदा बारावीत एजाजला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. पण पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारने मदत करण्याची गरज असल्याचे त्याचे आई सांगते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ejaz a recipient of national child bravery award is doing mercenary work due to financial crisis msr
First published on: 25-01-2022 at 15:59 IST