लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : वाढत्या उत्पादनाच्या हव्यासातून होत असलेल्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक नियंत्रणाच्या उपाय योजना करण्याची गरज आहे असे मत आमदार अरूण लाड यांनी व्यक्त केले.

Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
Bhau Daji Lad Museum, Devendra Fadnavis, Renovation ,
आक्रमणे आणि अनास्थेमुळे भारताच्या ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास – देवेंद्र फडणवीस, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण

क्रांती कारखान्याच्या कार्यस्थळावर अनुसूचित जाती वर्गातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॅटरीवर चालणारे फवारणी पंप व अनुषांगिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे प्रशिक्षण भारतीय उस संशोधन संस्था लखनौच्या जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ.योगेश थोरात, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

यावेळी बोलताना आ. लाड म्हणाले, अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते व किटकनाशके याचा बेसुमार वापर वाढला आहे. शेतीतील उत्पादन वाढले असले तरी रासायनिक निविष्ठांमुळे निसर्ग साखळी विस्कळीत झाली आहे, नैसर्गिक किड नियंत्रण कमी झाले आहे. शेतीचा पोत सुधारणेसाठी जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना अमलात आणणे आवश्यक बनले आहे.

यावेळी डॉ. थोरात यांनी ऊसपिकावर येणाऱ्या किडी व त्याच्या नियंत्रणासाठी संशोधन केंद्रामार्फत विकसित केलेले जैविक नियंत्रणाचे उपाय या विषयी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले तर संचालक संग्राम जाधव यांनी आभार मानले.

Story img Loader