|| प्रशांत देशमुख 

प्राथमिक शिक्षक समितीचा संताप

वर्धा : आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या बडग्यातून शिक्षकांची अद्याप सुटका झाली नसतानाच आता वाळू चोरी व  पाणी गळतीच्या नियंत्रणासाठी  शिक्षकांना जुंपले जात असल्याने समोर आले आहे.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

शिक्षकांना कोणत्याही अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करू नये, असे आदेश शासनाने अनेकवेळा काढले. दरवार्षिक जनगणना, आपत्ती निवारण व निवडणूक कर्तव्याखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी शिक्षकांना नियुक्त न करण्याचे निर्देश शिक्षणाचा अधिकार अंतर्गत नमूद आहेत. मात्र करोना काळात आपत्ती निवारणाच्या नावाखाली अतार्किक कामे शिक्षकांवर सोपवण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्हय़ात पैठण येते गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू चोरीच्या नियंत्रणासाठी शिक्षकांना नियुक्त करण्याचा प्रकार जूनमध्ये घडला होता. आता रत्नागिरी जिल्हय़ातील मंडणगड तालुक्यातील पाणदेरी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी तीन पाळय़ांमध्ये २१ शिक्षकांना नियुक्त करण्याचे आदेश ६ जूलैला देण्यात आले आहेत. आपत्ती निवारण कायद्याचा संदर्भ देत तहसीलदाराने हे आदेश काढले. यापूर्वी टाळेबंदी उठल्यानंतर अकोला जिल्हय़ात दारूची दूकाने सुरू करण्यात आली होती. तिथे उसळणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिक्षकांना कामाला लावण्यात आले होते.    या प्रकरांमुळे राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याच्या शिक्षक आयुक्तांना तसेच शिक्षक संचालकांकडे शनिवारी आपला संताप व्यक्त केला. करोना  काळात कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांचा शासनाने कुठेही ‘फ्रंट लाईन वर्कर’ असा उल्लेख केलेला नाही.   दोनशेवर शिक्षकांचे राज्यात मृत्यू झाले. अद्याप मोबदल्याचा विचार झालेला नाही. मात्र आपत्ती निवारणाच्या नावाखाली कामे सुरूच आहेत, याकडे या संघटनेने लक्ष वेधले.

अनाकलनीय प्रकार

धरणावर किंवा वाळू चोरी नियंत्रणासाठी शिक्षकांना जुंपण्याचा प्रकार अनाकलनीय आहे.   शिक्षकांच्या मूळ नियुक्ती कर्तव्याचा विचार झालाच पाहिजे. आपत्ती निवारण करायचे म्हणून शिक्षकांनी कोणतेही काम केव्हाही करावी, ही अपेक्षा अत्यंत चुकीची आहे. – विजय कोंबे,  शिक्षक नेते.