नाशिक: वारंवार किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा संताप अनावर झाल्याने पित्यानेच मुलीचा गळा आवळून खून केला. शहरातील एक्स्लो पॉइंटजवळील रामकृष्ण नगरात ही घटना घडली. ज्योती भारती (२४) ही घरात झालेल्या किरकोळ भांडणावरून घर सोडून निघून जात असे. याचा तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत असे. काही दिवसांपासून ज्योती आणि तिचेे वडील यांच्यात लग्नावरून वाद सुरू होते.

ज्योतीने पुन्हा घर सोडून जाण्याची धमकी दिल्याने वडील रामकिशोर भारती यांचा राग अनावर होऊन त्यांनी ज्योतीचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, उपनिरीक्षक संदीप पवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. याप्रकरणी संशयित रामकिशोर याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!