पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड गावातील २०० घरे पाण्याखाली आली आहेत. मुसळधार पावसासह धरणाचे पाणी सोडल्याने या परिसरातील १५० गावांचा संपर्क तुटला असून गडचिरोली जिल्ह्यातील नऊ मार्ग बंद झाले आहेत.

भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. यावर्षी सलग दुसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला असून, पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. पर्लकोटा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. भामरागड गावातील किमान २०० घरे पुराच्या पाण्याखाली आली आहेत. सिरोंचा तालुक्यातील अट्टीवागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने त्या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती नदीला पूर आल्याने दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली-भामरागड, असरअल्ली-सोमनपल्ली, कसनसूर-भामरागड-कवंडे, रोमपल्ली-झिंगानूर, हेमलकसा-सूरजागड, वैरागड-रांगी, कुरखेडा-वैरागड, कुरखेडा-पुराडा, पुराडा-धानोरा मार्ग बंद झाले आहेत. तसेच अनेक छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्याने छोटी गावे देखील संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.