scorecardresearch

जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचा फोटो घेऊन नाचण्याची घटना, मंत्री गिरीश महाजन म्हणाले…

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचा फोटो घेऊन काहीजण नाचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Girish Mahajan on Nathuram Godse
"गणेश विसर्जन मिरवणुकीत नथुराम गोडसेचा फोटो घेऊन नाचणे समर्थनीय नाही, असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचा फोटो घेऊन काहीजण नाचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आता या विषयावर ग्रामविकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “गणेश विसर्जन मिरवणुकीत नथुराम गोडसेचा फोटो घेऊन नाचणे समर्थनीय नाही, असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

गिरीश महाजन म्हणाले, “गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेंचा फोटो घेऊन नाचणे समर्थनीय नाही. त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. याबाबत मला माहिती नाही. मी मुंबईला होतो, आजच जळगाव जिल्ह्यात आलो आहे. असं झालं असेल तर निश्चित चौकशी केली जाईल.”

Onion auction Nashik district
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत होण्याची चिन्हे, विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात लिलावाला प्रारंभ
ganesh visarjan karjat
VIDEO: कर्जतमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेले चारजण उल्हास नदीत बुडाले, एकाला वाचवण्यात यश
ANNIS Magical claim Ganesh statue
VIDEO: सांगलीत गणेश मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू आल्याचा दावा, अंनिसचं आव्हान, म्हणाले…
karad conflict
दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ

“आदूबाळाने या सरकारला सळो की पळो करून सोडलं”

“आदूबाळाने या सरकारला सळो की पळो करून सोडलं”, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी सरकारला सळो की पळो करून सोडलं असं त्यांना वाटतं का. या सगळ्या बाळलाडामुळेच उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले आहेत. आपल्या बाळ्याला सांभाळता सांभाळता उद्धव ठाकरेंना सर्व लोक सोडून गेले. हे सर्व सोडून जाण्याला हे आदू बाळच कारणीभूत आहे, असं मला वाटतं.”

हेही वाचा : “ठाकरेंबरोबर साखरपुडा झालाय, पण लग्नासाठी दोन भटजी…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…

“तर आदित्य ठाकरेंनी स्वतःचं कौतुक करून घ्यावं”

“आदित्य ठाकरेंमुळेच ४३ आमदार-खासदार सोडून गेले. त्यांच्याकडे राहिलं काय? असं असूनही त्यांना स्वतःचंच कौतुक असेल, तर त्यांनी ते कौतुक करून घ्यावं. म्हणजे राहिलेलं सगळं पुसलं जाईल,” असं म्हणत गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girish mahajan comment on nathuram godse photo in ganesh visarjan in jalgaon pbs

First published on: 01-10-2023 at 21:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×