राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये फोन कॉलवरुन विविध समस्या सोडवल्याचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत होते. अशाच प्रकारे शिंदे स्टाइलमध्ये आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. इतकच नाही तर या अधिकाऱ्यांशी बोलताना महाजन यांनी आपणच या सदोष रस्त्यावरुन जाताना दोन-तीन वेळा मरता मारता वचलो आहे. किती मृत्यू झाल्यानंतर तुम्हा अधिकाऱ्यांना जाग येणार आहे असा सवाल विचारत महानज यांनी तातडीने काम सुरु करुन महिन्याभरात कामाचं टेंडर काढण्याचे आदेश दिलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव आणि नाशिकचे पालकमंत्री असणाऱ्या महाजन यांनी सोमवारी धुळ्यामध्ये सुरु असणाऱ्या भाकप, किसान सभा, शेतमजूर युनियनच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने देण्यात यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. यानंतर आंदोलकांनी शिरपूर चोपडा रस्ता, बभळाज रस्ता खराब असल्याची माहिती दिली. यानंतर रस्त्यांचं कामं न केल्याने महाजनांनी अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच फोनवरुन झापलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan slams officers over phone call about road work scsg
First published on: 04-10-2022 at 10:32 IST