महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या ‘संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० गट ब’च्या उत्तरतालिकेतील चुकांबाबत उच्च न्यायालयात दाद मागितलेल्या ८६ उमेदवारांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. संबंधित ८६ उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी सामावून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र एमपीएससीच्या चुकांमुळे गुणांचा फटका बसलेल्या आणि न्यायालयात याचिका दाखल न केलेल्या अन्य उमेदवारांचे काय, असा प्रश्न निर्माण होत असून, आता या परीक्षेबाबत मोठा गुंता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याप्रकरणी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारली आहे, आणि ते आता सक्रीय झाले, हे ऐकून मला आनंद झाला. म्हणूनच मी आज जवळपास साडे तीन हजार एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधतोय. संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मध्ये झालेला गोंधळ समोर आला आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेला बसण्याची परवानगी दिली. पण उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च न्यायालयाचा दरवाचा ठोठावू शकले नाही. मग त्यांना न्याय मिळणार नाही का? त्यामुळेच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने त्वरीत विचार करावा. मला सरकारला हे सांगायचं की, एम्पीएसस्सी ने प्रश्नपत्रिका व उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे हे, मा. उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopichand padalkar warning to uddhav thackeray government abn
First published on: 26-01-2022 at 15:33 IST