महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठी सभा आयोजित केली आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांची भाषणं होणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी राज्यातलं एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, त्यांनी कितीही प्रयत्न केले तर सभा होणारच. सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्वच दिसत नाही. गृहमंत्र्यांचं अस्तित्व केवळ विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्यापुरते आहेत. अनेकदा तेदेखील आदेश मुख्यमंत्री देतात. जुनी प्रकरणं उकरून नवे खटले दाखल करणं सध्या सुरू आहे. पण डाव उलटा पडला तर उद्या आम्ही सत्तेत येऊ, मग तुम्हाला या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील, खासकरून पोलिसांना उत्तरं द्यावी लागतील.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

राज्यात गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड दंगली घडवल्या जात आहेत; संजय राऊतांचा आरोप

राऊत म्हणाले की, राज्यात गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड (सरकार प्रायोजित) दंगली घडवल्या जात आहेत. कारण ते घाबरले आहेत. म्हणूनच त्यांनी हिंदू-मुस्लीम राजकारण सुरू केलं आहे. भाजपाशासित राज्यातच दंगली का होतात? कारण तुम्ही काही लोकांना हाताशी धरून स्पॉन्सर्ड दंगली निर्माण करता.

हे ही वाचा >> “उंटावरून शेळ्या हाकणारे”, राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून सुषमा अंधारेंचा टोला, म्हणाल्या, “यांचे खरे चेहरे…”

खासदार राऊत म्हणाले की, अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण करण्यात आली आहे. परंतु दोन्ही धर्माच्या (हिंदू-मुस्लीम) लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती आटोक्यात राहिली. महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी सभा होणार आहे. ती सभा होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला परवानगी मिळू नये यासाठी अशा प्रकारचा तणाव निर्माण केरण्याचा प्रयत्न केला जात आहे.