गुजरात निवडणुकीत भाजपाने आपला इतिहासातील सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे. भाजपाने आपले सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भाजपाने १५७ जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. हा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा आहे, असे मत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. सातारमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देसाई म्हणाले, या विजयानंतर मोदींच्या विचारांच्या पाठीशी जनता उभी रााहिल्याचे दिसून आले आहे. कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून दिसून आले आहे, असं म्हणत देसाईंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला आहे.

Wardha Lok Sabha, pm modi,
“आता बस झाले, यापुढे सभा मिळणार नाही,” कोणी दिला इशारा? जाणून घ्या सविस्तर…
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
raju shetty uddhav thackeray (1)
“…म्हणून मी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही”, राजू शेट्टींनी स्पष्ट केली भूमिका
opposition india alliance
बिहार ते महाराष्ट्र; लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसला करावी लागतेय तारेवरची कसरत

हेही वाचा- हिमाचल प्रदेश निवडणुकीवरून अजित पवारांचा नड्डांना खोचक टोला; म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना…”

देशाला दिशा देणाऱ्या गुजरातच्या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन, विचारांवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेच्या २०२४ सालच्या निवडणुकीला या निकालाने दिशा मिळाली. विविध राज्ये आणि देशही अपेक्षित विकास आणि प्रगतीत अव्वलस्थान गाठत असल्याने नरेंद्र मोदींच्या पाठीशी जनता उभी राहिली असल्याचा विश्वास मंत्री शंभूराज यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- “महाराष्ट्रद्रोह्यांना वेळीच आवरले नाही, तर…”; उद्धव ठाकरेंचे शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्र, गुजरात निवडणुकीवरूनही लगावला टोला

संजय राऊतांवरही लक्ष्य

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी संजय राऊत यांना कधी चार दिवस अटक झाली आहे का? राऊत यांनी वाचाळ बडबड बंद करावी, असा टोलाही शंभूराज देसाईंनी राऊतांना लगावला आहे. संजय राऊत यांना धमकीचे फोन आले हे सांगण्यास चोवीस तास का लागले? असाही प्रश्न शंभूराजेंनी उपस्थित केला.