मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडल्याचं वक्तव्य केलं. यातून त्यांनी नुकतीच शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि ५० आमदारांनी त्यांना दिलेला पाठिंबा यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. आता त्यावर पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. त्यांच्या ५० थरांच्या दहीहंडीमुळेच सत्तांतर झालं.”

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
shrikant shinde on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी माझ्या नावाची घोषणा केली असली तरी…” कल्याणच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी (२० ऑगस्ट) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरेंच्या या जळगाव दौऱ्याविषयी विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, “त्यांना येऊ द्या, त्यांच्या पक्षाचं काम आहे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे.”

हेही वाचा : “आम्ही ५० थरांची हंडी फोडली” टेंभी नाका दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी

“करोनामुळे देशभरात उत्सव बंद होते. यंदा राज्य सरकारने याला वेगळ्या प्रकारे मान्यता दिली. त्यामुळे दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्व जनतेने आनंद उत्सव साजरा केला,” असंही पाटील यांनी नमूद केलं.